सायली म्हणजे आई बाबांचा जीव की प्राण होती. लहानपणापासूनच त्यांनी तिचे अगदी लाडात पालनपोषण केले होते. प्रत्येक आईबाबांना आपली मुले लाडकी असतातच अगदी तस्संच टिपीकल नातं त्यांच्यात होतं.
अगदी शाळेत असल्यापासूनच सायली हुशार होती. वर्गात नेहमी पहिल्या तीनाच्या आतच नंबर काढायची. तिच्या मैत्रिणींना तिचा खुप हेवा वाटायचा. आईबाबांनाही लेकीचा अभिमान तर शिक्षकांना खुप कौतुक वाटायचे.
हळूहळू सायली मोठी होऊ लागली. आता ती बारावीत गेली होती. तिचे वागणेही हल्ली जबाबदारीचे वाटत होते. बारावीच्या वर्गात गेल्यावर जणू काही मुले शहाण्यासारखी वागू लागतात असं लॉजीक की एक सुप्त टेन्शन मुलांच्या मनात असतं ही सत्यता...पण मुलं थोडी दडपणाखाली वावरतातच.
तसा सायलीचा आभ्यास मस्तच चालला होता. बारावी विज्ञान शाखेतून तिने प्रवेश घेतला होता. आज सकाळी सकाळीच सायली थोडी नाराज दिसत होती. काम करता करता तिच्या आईचे लक्ष तिच्याकडे गेले.
"बाळ, काय झालं? आज नाराज का दिसत आहेस बेटा?"
"काही नाही आई..."
"कसलं टेन्शन वैगेरे आहे का गं? मला सांगायला हरकत नाही."
"आई, मी तुमचे स्वप्न पूर्ण नाही करु शकले तर??"
या प्रश्नावर आई दचकून गेली. आईचा चेहरा पडला. उसने हसू आणून ती म्हणाली, "बाळ अगं असं काय म्हणत आहेस आज?"
"असंच." सायलीचा चेहरा केविलवाणा दिसत होता.
सायली एक वाक्य बोलून गेली आणि आईच्या मनात जणू वादळ घोंगावू लागले. सायलीच्या बारावीच्या परिक्षेऐवजी तिच्या मनाच्या घालमेलीने आई अस्वस्थ झाली होती.
संध्याकाळी कामातून सायलीचे बाबा घरी आले. सायलीच्या आईकडून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले. हातपाय धुऊन मग ते सायलीच्या आभ्यासाच्या खोलीत गेले.
सायली आभ्यासात मग्न होती. बाबांनी तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.
"बेटा, घाबरायचे नाही...मी आहे ना." बाबांच्या डोळ्यांत पाणी आले.
बाबांनी दिलेला धीर पाहून सायली त्यांना बिलगली. एकूलती एक मुलगी अशी परीक्षेच्या टेन्शनमध्ये असणे बाबांना रुचले नाही. म्हणूनच ते सायलीला धीर देऊन तिचा आत्मविश्वास वाढवू लागले.
आईबाबा खंबीरपणे पाठीशी असल्याने सायलीचे टेन्शन थोडे कमी झाले.
"आपल्यापरीने भरपूर प्रयत्न करायचा. अपयश आले तरी खचून जायचे नाही. पुन्हा प्रयत्न करायचा...यश मिळेपर्यंत हा सिलसिला सुरु ठेवायचा." हा अगदी मौल्यवान कानमंत्र बाबांनी सायलीला देऊन ठेवला होता.
पुढे दिवस निघून गेले. आणि परिक्षेचे दिवस सुरु झाले. सायलीचा आभ्यास जोर धरु लागला. पेपर सोपे जात होते. आज शेवटचा पेपर होता.
सायली निघून तयार झाली. आईबाबांच्या पाया पडली. देवालाही नमस्कार केला आणि घराबाहेर पडली. पण आज सायलीचे शरीर तिला साथ देत नव्हते. शाळेत जाता जाता तिचे अंग तापाने फणफणले. पण इलाज नव्हता. पेपर वेळेत सुरु होणार असल्याने तिला डॉक्टरकडे जायला मिळाले नाही. तशाच अवस्थेत ती पेपर लिहीत होती. तिचे हात थरथर करत होते. अक्षरे नीटशी वळत नव्हती. लिखाणाचा स्पीड कमी झाला..त्यातच भर म्हणून वाचलेलेही विस्मरणात गेले की काय असे तिला वाटू लागले. या सर्वाचा एकत्रित परिणाम व्हायचा तोच झाला. सायलीला शेवटचा पेपर कठीण गेला.
पेपर सुटला. सायलीच्या मैत्रिणींनी तिला दवाखान्यात नेले. तेथून मग ती तिच्या घरी गेली. रात्रीपर्यंत ताप कमी झाला होता. पण आजच्या दिवसातील घडामोडी तिने घरी मात्र सांगीतल्या नाहीत.
परीक्षा संपल्याने आई बाबांचे टेन्शन साफ उतरले होते परंतू त्या दिवसापासून सायली मात्र अस्वस्थ वाटत होती.
'काय करावं? आई बाबांना कसं सांगावं? त्यांना वाईट तर वाटणार नाही?' हे विचारचक्र तिच्या मनात सुरु होते. त्यापुढचा जवळजवळ दीडेक महीना असाच गेला.
आज बारावीच्या निकालाचा दिवस होता. आईबाबा आणि इतर नातेवाईकांची सुद्घा सायलीच्या निकालाबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. मात्र निकाल काय असेल याची पूरेपूर जाणीव सायलीला होती. तिचा चेहराच जणू ते व्यक्त करीत होता.
सकाळी नेहमीप्रमाणे ऊठून ती तयार झाली. देवाला नमस्कार केला. आई बाबांच्या पाया पडली आणि रिझल्ट आणायला घराबाहेर पडली.
दुपार झाली. तिचे आईबाबा घरी तिची आतुरतेने वाट बघत होते. बघता बघता संध्याकाळही व्हायला आली. तरीही सायलीचा पत्ता नव्हता. आई बाबांची चिंता वाढू लागली. कॉलेजमध्ये, मैत्रिणींकडे चौकशी करुन झाली. त्यांच्याकडून सायली नापास झाल्याचे कळताच ते दोघेही पुरते हादरुन गेले.
आता पोलिस स्टेशन गाठण्याशिवाय दुसरा मार्गच त्यांना सूचेना..'मुलीने जीवाचं काही बरंवाईट.....' असे चित्रविचित्र विचार मनात वादळासारखे घोंगावू लागले.
सायलीच्या आईबाबांना या विचारांनी जणू घामच फुटला होता. सायली म्हणजे त्या दोघांच्याही काळजाचा तुकडा होता. झपाझप पावले टाकत, धावत ते दोघेही पोलिस स्टेशनच्या दिशेन निघाले. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूधारा ओघळत होत्या.
कसेबसे ते पोलिस स्टेशनला पोहोचले. तिथे रडतच सर्व हकीकत उपस्थित पोलिसांना सांगितली.
'नुकताच कुठल्यातरी एका मुलीने नदीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केलाय. तिला जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात अॅम्ब्यूलन्समधून आणले आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचा पंचनामा सुरु आहे.' अशी वार्ता तेव्हा तिथल्या पोलिसांकडून त्यांना मिळाली आणि सायलीच्या आईने हंबरडाच फोडला. घाबरुन दोघांचीही मोठ्याने रडारड सुरु झाली. मग पोलिसांच्याच गाडीतून त्यांना ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आले.
पोलिसांच्या गाडीतून उतरल्या बरोबर पंचनामा करणारे दोन पोलिस जवळ येऊन म्हणाले, "सायली जाधव तुमचीच मुलगी का? तुम्ही तिचेच आईवडील का??"
या पोलिसांच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे भान विसरुन दोघेही धाय मोकलून रडू लागले. त्यांचे जणू अवसानच गळाले. त्यांच्या दृष्टीने आता सारे काही संपले होते.
"अहो सायलीचे आई बाबा तुम्ही रडताय कशाला??"
रडता रडताच पोलिसाचे आश्चर्यकारक बोलणे त्यांच्या कानी पडले.
"अहो खरंच ! तुम्हाला तर आनंद वाटायला पाहजे. तुमच्या सायलीची कर्तबगारी महान आहे. तुम्हाला तिचा अभिमान वाटायला हवा." पोलिस हसऱ्या चेहऱ्यानेच म्हणाला.
सायलीचे आईबाबा चक्रावून गेले. नक्की काय झालंय कळेना. अश्रू पुसता पुसताच बाबांनी विचारलं, "म्हणजे? तुम्ही नक्की काय म्हणताय?"
"अहो तुमच्या सायलीने आज नदीत उडी मारलेल्या एका मुलीचा जीव वाचवलाय. नुसताच अभिमान नव्हे तर 'वीरता' पुरस्कार मिळायला हवाय तिला अशी कामगिरी केलेय तिने !"
हे वाक्य ऐकल्याबरोबर सायलीच्या आईबाबांचा चेहरा खुलला. त्यांच्या जीवात जीव आला. त्यांना हायसे वाटले. तोच त्यांना रुग्णालयातून सायली बाहेर पडताना दिसली. तिचा चेहरा आनंदीत होता. आईने तिला जवळ घेतले.
"सायली बेटा...आम्ही खुप घाबरलो होतो. तुला घरी यायला ऊशीर झाल्याचं खरं कारण आता लक्षात येतंय आमच्या."
"हो बाबा...ती मुलगी नापास झाली होती. पण तिने चुकीचा मार्ग पत्करला होता. बाबा जीव दिल्याने प्रश्न सुटत नाहीच, उलट वाढतो. आयुष्यभर आपल्या जीवलगांना ते कडवं सत्य पचवताच येत नाही. आणि हो...जीव देणं म्हणजे शूरपणा नाहीच. असं मरण्यापेक्षा परिस्थितीशी प्रयत्नांनी लढून, सामना करुन जिंकलेलं कधीही चांगलं..."
"आपली पोर आता खरंच मोठी आणि हुश्शार झालीय हं." सायलीची आई हसतच म्हणाली.
"मग, मुलगी कुणाची आहे..." बाबाही हसतच म्हणाले.
"बाबा, मी सुद्धा नापास झालीय. पण मी हार मानणार नाही. पुन्हा जोमाने प्रयत्न करेन."
सायली भलेही नापास झाली होती...पण तरीही बाबांनी मोठ्या अभिमानाने लेकीचे कौतूक करीत सर्वच नातेवाईकांना पेढे वाटले.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
लेखन-श्री. प्रविण निकम
अगदी शाळेत असल्यापासूनच सायली हुशार होती. वर्गात नेहमी पहिल्या तीनाच्या आतच नंबर काढायची. तिच्या मैत्रिणींना तिचा खुप हेवा वाटायचा. आईबाबांनाही लेकीचा अभिमान तर शिक्षकांना खुप कौतुक वाटायचे.
हळूहळू सायली मोठी होऊ लागली. आता ती बारावीत गेली होती. तिचे वागणेही हल्ली जबाबदारीचे वाटत होते. बारावीच्या वर्गात गेल्यावर जणू काही मुले शहाण्यासारखी वागू लागतात असं लॉजीक की एक सुप्त टेन्शन मुलांच्या मनात असतं ही सत्यता...पण मुलं थोडी दडपणाखाली वावरतातच.
तसा सायलीचा आभ्यास मस्तच चालला होता. बारावी विज्ञान शाखेतून तिने प्रवेश घेतला होता. आज सकाळी सकाळीच सायली थोडी नाराज दिसत होती. काम करता करता तिच्या आईचे लक्ष तिच्याकडे गेले.
"बाळ, काय झालं? आज नाराज का दिसत आहेस बेटा?"
"काही नाही आई..."
"कसलं टेन्शन वैगेरे आहे का गं? मला सांगायला हरकत नाही."
"आई, मी तुमचे स्वप्न पूर्ण नाही करु शकले तर??"
या प्रश्नावर आई दचकून गेली. आईचा चेहरा पडला. उसने हसू आणून ती म्हणाली, "बाळ अगं असं काय म्हणत आहेस आज?"
"असंच." सायलीचा चेहरा केविलवाणा दिसत होता.
सायली एक वाक्य बोलून गेली आणि आईच्या मनात जणू वादळ घोंगावू लागले. सायलीच्या बारावीच्या परिक्षेऐवजी तिच्या मनाच्या घालमेलीने आई अस्वस्थ झाली होती.
संध्याकाळी कामातून सायलीचे बाबा घरी आले. सायलीच्या आईकडून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले. हातपाय धुऊन मग ते सायलीच्या आभ्यासाच्या खोलीत गेले.
सायली आभ्यासात मग्न होती. बाबांनी तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.
"बेटा, घाबरायचे नाही...मी आहे ना." बाबांच्या डोळ्यांत पाणी आले.
बाबांनी दिलेला धीर पाहून सायली त्यांना बिलगली. एकूलती एक मुलगी अशी परीक्षेच्या टेन्शनमध्ये असणे बाबांना रुचले नाही. म्हणूनच ते सायलीला धीर देऊन तिचा आत्मविश्वास वाढवू लागले.
आईबाबा खंबीरपणे पाठीशी असल्याने सायलीचे टेन्शन थोडे कमी झाले.
"आपल्यापरीने भरपूर प्रयत्न करायचा. अपयश आले तरी खचून जायचे नाही. पुन्हा प्रयत्न करायचा...यश मिळेपर्यंत हा सिलसिला सुरु ठेवायचा." हा अगदी मौल्यवान कानमंत्र बाबांनी सायलीला देऊन ठेवला होता.
पुढे दिवस निघून गेले. आणि परिक्षेचे दिवस सुरु झाले. सायलीचा आभ्यास जोर धरु लागला. पेपर सोपे जात होते. आज शेवटचा पेपर होता.
सायली निघून तयार झाली. आईबाबांच्या पाया पडली. देवालाही नमस्कार केला आणि घराबाहेर पडली. पण आज सायलीचे शरीर तिला साथ देत नव्हते. शाळेत जाता जाता तिचे अंग तापाने फणफणले. पण इलाज नव्हता. पेपर वेळेत सुरु होणार असल्याने तिला डॉक्टरकडे जायला मिळाले नाही. तशाच अवस्थेत ती पेपर लिहीत होती. तिचे हात थरथर करत होते. अक्षरे नीटशी वळत नव्हती. लिखाणाचा स्पीड कमी झाला..त्यातच भर म्हणून वाचलेलेही विस्मरणात गेले की काय असे तिला वाटू लागले. या सर्वाचा एकत्रित परिणाम व्हायचा तोच झाला. सायलीला शेवटचा पेपर कठीण गेला.
पेपर सुटला. सायलीच्या मैत्रिणींनी तिला दवाखान्यात नेले. तेथून मग ती तिच्या घरी गेली. रात्रीपर्यंत ताप कमी झाला होता. पण आजच्या दिवसातील घडामोडी तिने घरी मात्र सांगीतल्या नाहीत.
परीक्षा संपल्याने आई बाबांचे टेन्शन साफ उतरले होते परंतू त्या दिवसापासून सायली मात्र अस्वस्थ वाटत होती.
'काय करावं? आई बाबांना कसं सांगावं? त्यांना वाईट तर वाटणार नाही?' हे विचारचक्र तिच्या मनात सुरु होते. त्यापुढचा जवळजवळ दीडेक महीना असाच गेला.
आज बारावीच्या निकालाचा दिवस होता. आईबाबा आणि इतर नातेवाईकांची सुद्घा सायलीच्या निकालाबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. मात्र निकाल काय असेल याची पूरेपूर जाणीव सायलीला होती. तिचा चेहराच जणू ते व्यक्त करीत होता.
सकाळी नेहमीप्रमाणे ऊठून ती तयार झाली. देवाला नमस्कार केला. आई बाबांच्या पाया पडली आणि रिझल्ट आणायला घराबाहेर पडली.
दुपार झाली. तिचे आईबाबा घरी तिची आतुरतेने वाट बघत होते. बघता बघता संध्याकाळही व्हायला आली. तरीही सायलीचा पत्ता नव्हता. आई बाबांची चिंता वाढू लागली. कॉलेजमध्ये, मैत्रिणींकडे चौकशी करुन झाली. त्यांच्याकडून सायली नापास झाल्याचे कळताच ते दोघेही पुरते हादरुन गेले.
आता पोलिस स्टेशन गाठण्याशिवाय दुसरा मार्गच त्यांना सूचेना..'मुलीने जीवाचं काही बरंवाईट.....' असे चित्रविचित्र विचार मनात वादळासारखे घोंगावू लागले.
सायलीच्या आईबाबांना या विचारांनी जणू घामच फुटला होता. सायली म्हणजे त्या दोघांच्याही काळजाचा तुकडा होता. झपाझप पावले टाकत, धावत ते दोघेही पोलिस स्टेशनच्या दिशेन निघाले. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूधारा ओघळत होत्या.
कसेबसे ते पोलिस स्टेशनला पोहोचले. तिथे रडतच सर्व हकीकत उपस्थित पोलिसांना सांगितली.
'नुकताच कुठल्यातरी एका मुलीने नदीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केलाय. तिला जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात अॅम्ब्यूलन्समधून आणले आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचा पंचनामा सुरु आहे.' अशी वार्ता तेव्हा तिथल्या पोलिसांकडून त्यांना मिळाली आणि सायलीच्या आईने हंबरडाच फोडला. घाबरुन दोघांचीही मोठ्याने रडारड सुरु झाली. मग पोलिसांच्याच गाडीतून त्यांना ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आले.
पोलिसांच्या गाडीतून उतरल्या बरोबर पंचनामा करणारे दोन पोलिस जवळ येऊन म्हणाले, "सायली जाधव तुमचीच मुलगी का? तुम्ही तिचेच आईवडील का??"
या पोलिसांच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे भान विसरुन दोघेही धाय मोकलून रडू लागले. त्यांचे जणू अवसानच गळाले. त्यांच्या दृष्टीने आता सारे काही संपले होते.
"अहो सायलीचे आई बाबा तुम्ही रडताय कशाला??"
रडता रडताच पोलिसाचे आश्चर्यकारक बोलणे त्यांच्या कानी पडले.
"अहो खरंच ! तुम्हाला तर आनंद वाटायला पाहजे. तुमच्या सायलीची कर्तबगारी महान आहे. तुम्हाला तिचा अभिमान वाटायला हवा." पोलिस हसऱ्या चेहऱ्यानेच म्हणाला.
सायलीचे आईबाबा चक्रावून गेले. नक्की काय झालंय कळेना. अश्रू पुसता पुसताच बाबांनी विचारलं, "म्हणजे? तुम्ही नक्की काय म्हणताय?"
"अहो तुमच्या सायलीने आज नदीत उडी मारलेल्या एका मुलीचा जीव वाचवलाय. नुसताच अभिमान नव्हे तर 'वीरता' पुरस्कार मिळायला हवाय तिला अशी कामगिरी केलेय तिने !"
हे वाक्य ऐकल्याबरोबर सायलीच्या आईबाबांचा चेहरा खुलला. त्यांच्या जीवात जीव आला. त्यांना हायसे वाटले. तोच त्यांना रुग्णालयातून सायली बाहेर पडताना दिसली. तिचा चेहरा आनंदीत होता. आईने तिला जवळ घेतले.
"सायली बेटा...आम्ही खुप घाबरलो होतो. तुला घरी यायला ऊशीर झाल्याचं खरं कारण आता लक्षात येतंय आमच्या."
"हो बाबा...ती मुलगी नापास झाली होती. पण तिने चुकीचा मार्ग पत्करला होता. बाबा जीव दिल्याने प्रश्न सुटत नाहीच, उलट वाढतो. आयुष्यभर आपल्या जीवलगांना ते कडवं सत्य पचवताच येत नाही. आणि हो...जीव देणं म्हणजे शूरपणा नाहीच. असं मरण्यापेक्षा परिस्थितीशी प्रयत्नांनी लढून, सामना करुन जिंकलेलं कधीही चांगलं..."
"आपली पोर आता खरंच मोठी आणि हुश्शार झालीय हं." सायलीची आई हसतच म्हणाली.
"मग, मुलगी कुणाची आहे..." बाबाही हसतच म्हणाले.
"बाबा, मी सुद्धा नापास झालीय. पण मी हार मानणार नाही. पुन्हा जोमाने प्रयत्न करेन."
सायली भलेही नापास झाली होती...पण तरीही बाबांनी मोठ्या अभिमानाने लेकीचे कौतूक करीत सर्वच नातेवाईकांना पेढे वाटले.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
लेखन-श्री. प्रविण निकम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा