आज छोटा पाचवीतला आकाश झोपेतून लवकर ऊठला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. आईचा तो लाडका होता. ती आई आकाशचा डबा बनविण्याच्या घाईत होती. आकाश मात्र अाज अस्वस्थ वाटत होता. सारखाच बसण्याची ठिकाणं बदलत होता. किचनमध्ये आणि बाहेर चकरा मारत होता. काहीतरी भानगड असावी अशी त्याच्या आईला जाणीव झाली.
"आकाश अरे आंघोळ घेतोयस ना? शाळेला ऊशीर होईल."
"मी नाही जात शाळेत आई."
"म्हणजे?"
आकाश आईला बिलगला. मोठमोठ्याने रडू लागला.
"आकाश ! बाळा काय झालं?" आईने काळजीने विचारलं.
"आई, तू मला शिव्या का नाही शिकवल्यास?"
आकाशच्या प्रश्नाने आई जणू हादरलीच. काहीतरी भानगड आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले होते.
आकाशच्या शाळेतील त्याच्या वर्गातील दिलीप नवाचा मुलगा भलताच आगाऊ होता. त्याला नुसत्या शिव्या वैगेरे देण्यात खुप मजा वाटायची. इतरांच्या खोड्या करण्यात आनंद वाटायचा. वर्गातील इतर मुलांनाही कधीकधी त्याचा त्रास व्हायचा मात्र सध्याचे सात-आठ दिवस त्याच्या कचाट्यात आकाश सापडला होता. आकाशला तो चिडवायचा, बोलताना शिव्यागाळी करायचा. कधी ऊगाच खोडी काढून मारायचा सुद्धा ! आकाशचा आत्मविश्वास पुरता ढासळून जायचा. आणि तो भलताच नाराज व्हायचा. असे सातआठ दिवस सुरु होते. शिक्षकांकडे तक्रार केली तर तो आकाशनेच आम्हाला शिव्या दिल्या असे खोटेच सांगायचा. मग शिक्षकांकडूनही आकाशलाच ओरडा मिळायचा.
एवढ्याशा कोवळ्या वयातल्या आकाशला काय करावे तेच कळेना. विचित्र कात्रीत सापडला होता तो. आईला त्रास नको म्हणून ही गोष्ट आजपर्यंत त्याने तिला सांगीतली नव्हती.
त्याला आता शाळेत जायची भितीच वाटू लागली. म्हणूनच आज सकाळीच तो अस्वस्थ दिसत होता.
"अरे पण तू त्याला काहीच कसा बोलला नाहीस?"
"आई तू मला एवढं चांगलं का वागायला शिकवलंस?? तो मुलगा मला शिव्या देतो तेव्हा मला उलटून काहीच बोलता येत नाही. मला काही सूचतच नाही. आई तू मला शिव्या का नाही शिकवल्यास?? मला जर शिव्या येत असत्या तर मी सुद्धा त्याचा प्रतिकार करु शकलो असतो ना. तू मला मारामारी शिकवली असतीस तर मी त्याला मारलहीे असते. आई तू साफ चुकली आहेस !"
आकाशच्या या प्रश्नावर आई निरुत्तर झाली. काय उत्तर द्यावे हेच तिला कळेला. आकाशचे म्हणणे त्याच्या दृष्टीने योग्यच वाटत होते तिला. कारण आकाशला कुठल्याच स्वरुपात त्या मुलाला प्रतिकार करता येत नव्हता. कारण तो त्या मुलासारखा ऊनाड नव्हता. शिवाय आता आईला आकाशचा कॉन्फिडन्स ढासळू द्यायचा नव्हता.
लहान मुले कधीच एकट्याने परिस्थितीचा सामना करु शकत नाहीत. त्यांना आई वडिलांचा आधार लागतोच. आकाशला वडील नव्हते. त्याची आई आकाशला घेऊन त्याच्या शाळेत गेली. शिक्षकांना सारा प्रकार पटवून सांगीतला. शिक्षकांनीही त्यांची चूक मान्य करुन आकाशची बाजू घेतली. पुन्हा असे घडणार नाही असे आश्वासन त्याच्या आईला दिले. आणि आकाशचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.
वाईटाला वाईटाने नव्हे तर चांगल्याने जिंकायचे असते हेच शिक्षकांनी आजवर विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले होते. परंतू दिलीप मात्र त्याच्या पालकांच्या दुर्लक्षामुळे बिघडत चालला होता. दिलीपच्या पालकांनाही यापूर्वी खुप वेळा समज देऊन झाली होती. काय करावे हे शिक्षकांनाही कळेना.
दुसऱ्या दिवशी आकाश शाळेत आला. दिलीपही आला होता. सकाळी परिपाठ झाला. मुले आपापल्या वर्गात गेली. मराठीचा पहिला तास होता. वर्गशिक्षकांनी सर्व मुलांना एक निबंध लिहायला सांगीतला. निबंधाचा विषय होता- 'माझा आवडता मित्र'
वर्गातील सर्व मुले खाली माना घालून निबंध लिहू लागली.
निबंध लिहून झाल्यावर शिक्षकांनी प्रत्येक मुलाला पुढे येऊन आपापला निबंध वाचायला सांगितला. प्रत्येक मुलगा समोर येऊन आपापला निबंध वाचू लागला. सर्वात शेवटी दोनच मुले राहीली होती. आता पुढे यायचे होते दिलीपला. तो त्याने लिहीलेला कागद घेऊन पुढे आला. आणि रडू लागला. त्याचा कागद कोराच होता. त्याच्या वर्गातील वाईट वागण्यामुळे त्याचा कुणीच मित्र नव्हता आणि म्हणूनच तो निबंधात काहीच लिहू शकला नव्हता. त्याला सर्वांसमोर खुप कमीपणा वाटला. हुंदके देऊन रडू लागला. 'माझे चुकले. मी शाळेत असे वागायला नको होते.' असे रडत रडत म्हणू लागला. आणि रडतच जागेवर जाऊन बसला.
आता शेवटचा नंबर होता आकाशचा. आकाश आपला निबंध घेऊन सर्व विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहिला. आणि त्याने निबंध वाचायला सुरुवात केली-
'माझ्या वर्गातील माझ्या सर्वात आवडत्या मित्राचे नाव आहे.....दिलीप !'
सर्व मुले कान टवकारुन ऐकू लागली. सर्वांना थोडे विचित्र वाटले. दिलीपही रडता रडता आश्चर्याने पाहू लागला. निबंध ऐकू लागला-
'दिलीप हा खुप चांगला मुलगा आहे. तो माझ्याशीच नव्हे तर शाळेतील सर्वच मुलांशी खुप प्रेमाने वागतो. आम्हा सर्वांना तो खुप आवडतो. लवकरच दिलीप शाळेचा आदर्श विद्यार्थी बनून दाखवेल. आणि लवकरच त्याच्या आईबाबांचे त्याच्या बाबतीतले स्वप्न नक्कीच पूर्ण करुन दाखवेल अशी माझी खात्री आहे.'
आकाशचा निबंध दिलीपवर परिणाम करुन गेला. मधली सुटी झाली. प्रत्येकजण आपापला डबा खाऊ लागला. आकाशसुद्धा डब्यातली पोळीभाजी खाऊ लागला. इतक्यात त्याच्या पुढ्यात कुणीतरी आपला डबा सरकवला.
"आकाश...घे ना, तुला भेंडीची भाजी आवडते ना?"
आकाशने खाता खाता वर पाहिले. रडवेल्या चेहऱ्याने दिलीप उभा होता पुढ्यात.
"माझे चुकले मला माफ कर आकाश."
दिलीपच्या या वाक्यावर आकाशला काय बोलावे तेच कळेना. त्याने हसतच दिलीपचा डबा घेतला आणि त्यातली भेंडीची भाजी खाऊ लागला. मैत्री जुळली होती.
संध्याकाळी शाळा सुटली. आकाश घरी गेला. काल अस्वस्थ वाटणारा आकाश आज आनंदी दिसत होता.
"काय रे काय झालं, आज एवढा खुश?"
"आई तू खुप चांगली आहेस. तू मला शिव्या नाही शिकवल्या तेच योग्य होतं."
"बाळा, जगातल्या कुठल्याच आईचं आपल्या मुलाला वाईट गोष्टी शिकवण्याइतकं दगडाचं काळीज नसतं रे...."
आकाशच्या कोवळ्या मनातलं आईचं नातं आज नव्याने उलगडलं होतं...
_______________________________________
"आकाश अरे आंघोळ घेतोयस ना? शाळेला ऊशीर होईल."
"मी नाही जात शाळेत आई."
"म्हणजे?"
आकाश आईला बिलगला. मोठमोठ्याने रडू लागला.
"आकाश ! बाळा काय झालं?" आईने काळजीने विचारलं.
"आई, तू मला शिव्या का नाही शिकवल्यास?"
आकाशच्या प्रश्नाने आई जणू हादरलीच. काहीतरी भानगड आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले होते.
आकाशच्या शाळेतील त्याच्या वर्गातील दिलीप नवाचा मुलगा भलताच आगाऊ होता. त्याला नुसत्या शिव्या वैगेरे देण्यात खुप मजा वाटायची. इतरांच्या खोड्या करण्यात आनंद वाटायचा. वर्गातील इतर मुलांनाही कधीकधी त्याचा त्रास व्हायचा मात्र सध्याचे सात-आठ दिवस त्याच्या कचाट्यात आकाश सापडला होता. आकाशला तो चिडवायचा, बोलताना शिव्यागाळी करायचा. कधी ऊगाच खोडी काढून मारायचा सुद्धा ! आकाशचा आत्मविश्वास पुरता ढासळून जायचा. आणि तो भलताच नाराज व्हायचा. असे सातआठ दिवस सुरु होते. शिक्षकांकडे तक्रार केली तर तो आकाशनेच आम्हाला शिव्या दिल्या असे खोटेच सांगायचा. मग शिक्षकांकडूनही आकाशलाच ओरडा मिळायचा.
एवढ्याशा कोवळ्या वयातल्या आकाशला काय करावे तेच कळेना. विचित्र कात्रीत सापडला होता तो. आईला त्रास नको म्हणून ही गोष्ट आजपर्यंत त्याने तिला सांगीतली नव्हती.
त्याला आता शाळेत जायची भितीच वाटू लागली. म्हणूनच आज सकाळीच तो अस्वस्थ दिसत होता.
"अरे पण तू त्याला काहीच कसा बोलला नाहीस?"
"आई तू मला एवढं चांगलं का वागायला शिकवलंस?? तो मुलगा मला शिव्या देतो तेव्हा मला उलटून काहीच बोलता येत नाही. मला काही सूचतच नाही. आई तू मला शिव्या का नाही शिकवल्यास?? मला जर शिव्या येत असत्या तर मी सुद्धा त्याचा प्रतिकार करु शकलो असतो ना. तू मला मारामारी शिकवली असतीस तर मी त्याला मारलहीे असते. आई तू साफ चुकली आहेस !"
आकाशच्या या प्रश्नावर आई निरुत्तर झाली. काय उत्तर द्यावे हेच तिला कळेला. आकाशचे म्हणणे त्याच्या दृष्टीने योग्यच वाटत होते तिला. कारण आकाशला कुठल्याच स्वरुपात त्या मुलाला प्रतिकार करता येत नव्हता. कारण तो त्या मुलासारखा ऊनाड नव्हता. शिवाय आता आईला आकाशचा कॉन्फिडन्स ढासळू द्यायचा नव्हता.
लहान मुले कधीच एकट्याने परिस्थितीचा सामना करु शकत नाहीत. त्यांना आई वडिलांचा आधार लागतोच. आकाशला वडील नव्हते. त्याची आई आकाशला घेऊन त्याच्या शाळेत गेली. शिक्षकांना सारा प्रकार पटवून सांगीतला. शिक्षकांनीही त्यांची चूक मान्य करुन आकाशची बाजू घेतली. पुन्हा असे घडणार नाही असे आश्वासन त्याच्या आईला दिले. आणि आकाशचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.
वाईटाला वाईटाने नव्हे तर चांगल्याने जिंकायचे असते हेच शिक्षकांनी आजवर विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले होते. परंतू दिलीप मात्र त्याच्या पालकांच्या दुर्लक्षामुळे बिघडत चालला होता. दिलीपच्या पालकांनाही यापूर्वी खुप वेळा समज देऊन झाली होती. काय करावे हे शिक्षकांनाही कळेना.
दुसऱ्या दिवशी आकाश शाळेत आला. दिलीपही आला होता. सकाळी परिपाठ झाला. मुले आपापल्या वर्गात गेली. मराठीचा पहिला तास होता. वर्गशिक्षकांनी सर्व मुलांना एक निबंध लिहायला सांगीतला. निबंधाचा विषय होता- 'माझा आवडता मित्र'
वर्गातील सर्व मुले खाली माना घालून निबंध लिहू लागली.
निबंध लिहून झाल्यावर शिक्षकांनी प्रत्येक मुलाला पुढे येऊन आपापला निबंध वाचायला सांगितला. प्रत्येक मुलगा समोर येऊन आपापला निबंध वाचू लागला. सर्वात शेवटी दोनच मुले राहीली होती. आता पुढे यायचे होते दिलीपला. तो त्याने लिहीलेला कागद घेऊन पुढे आला. आणि रडू लागला. त्याचा कागद कोराच होता. त्याच्या वर्गातील वाईट वागण्यामुळे त्याचा कुणीच मित्र नव्हता आणि म्हणूनच तो निबंधात काहीच लिहू शकला नव्हता. त्याला सर्वांसमोर खुप कमीपणा वाटला. हुंदके देऊन रडू लागला. 'माझे चुकले. मी शाळेत असे वागायला नको होते.' असे रडत रडत म्हणू लागला. आणि रडतच जागेवर जाऊन बसला.
आता शेवटचा नंबर होता आकाशचा. आकाश आपला निबंध घेऊन सर्व विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहिला. आणि त्याने निबंध वाचायला सुरुवात केली-
'माझ्या वर्गातील माझ्या सर्वात आवडत्या मित्राचे नाव आहे.....दिलीप !'
सर्व मुले कान टवकारुन ऐकू लागली. सर्वांना थोडे विचित्र वाटले. दिलीपही रडता रडता आश्चर्याने पाहू लागला. निबंध ऐकू लागला-
'दिलीप हा खुप चांगला मुलगा आहे. तो माझ्याशीच नव्हे तर शाळेतील सर्वच मुलांशी खुप प्रेमाने वागतो. आम्हा सर्वांना तो खुप आवडतो. लवकरच दिलीप शाळेचा आदर्श विद्यार्थी बनून दाखवेल. आणि लवकरच त्याच्या आईबाबांचे त्याच्या बाबतीतले स्वप्न नक्कीच पूर्ण करुन दाखवेल अशी माझी खात्री आहे.'
आकाशचा निबंध दिलीपवर परिणाम करुन गेला. मधली सुटी झाली. प्रत्येकजण आपापला डबा खाऊ लागला. आकाशसुद्धा डब्यातली पोळीभाजी खाऊ लागला. इतक्यात त्याच्या पुढ्यात कुणीतरी आपला डबा सरकवला.
"आकाश...घे ना, तुला भेंडीची भाजी आवडते ना?"
आकाशने खाता खाता वर पाहिले. रडवेल्या चेहऱ्याने दिलीप उभा होता पुढ्यात.
"माझे चुकले मला माफ कर आकाश."
दिलीपच्या या वाक्यावर आकाशला काय बोलावे तेच कळेना. त्याने हसतच दिलीपचा डबा घेतला आणि त्यातली भेंडीची भाजी खाऊ लागला. मैत्री जुळली होती.
संध्याकाळी शाळा सुटली. आकाश घरी गेला. काल अस्वस्थ वाटणारा आकाश आज आनंदी दिसत होता.
"काय रे काय झालं, आज एवढा खुश?"
"आई तू खुप चांगली आहेस. तू मला शिव्या नाही शिकवल्या तेच योग्य होतं."
"बाळा, जगातल्या कुठल्याच आईचं आपल्या मुलाला वाईट गोष्टी शिकवण्याइतकं दगडाचं काळीज नसतं रे...."
आकाशच्या कोवळ्या मनातलं आईचं नातं आज नव्याने उलगडलं होतं...
_______________________________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा