बहुतेक वेळी लांबचा प्रवास म्हणजे एस.टी. ला पर्याय नसतो. हल्ली प्रवासात बरेचजण आपापल्या मोबाईलवर गाणी ऐकण्यात दंग असतात. माझा फोन मात्र प्रवासात नेमकीच मान टाकतो...अर्थात निघण्याच्या गडबडीत चार्जिंग करायचाच राहून जातो. आणि याचा मला पूर्वानुभव असल्याने बॅकअप प्लॅन म्हणून मी किमान २/3 वर्तमानपत्रे सोबत ठेवतोच.
पण हल्ली मला प्रवासात जरा वेगळाच अनुभव आला-
बसमध्ये बसल्यावर.."ओ जरा पेपर बघू.." असा आवाज कानी पडला. मग काय, नाईलाज का होईना पण पेपर द्यावेच लागले.
या वर्तमानपत्र उर्फ पेपरचे बरेच किस्से मी अनुभवले आहेत. काहीजण पेपर वाचायला तर घेतात पण वाचता वाचता झोपूनही जातात..आणि पेपर मात्र परत द्यायचं काहीे नाव काढत नाहीत...!!
काहीजण वाचायला तर घेतात पण जणू काही तो पेपर आपलाच आहे अशा डौलात त्यातलं बक्षिसाचं कोडं सोडवायला घेतात...
काहीजण तर पंख्यासारखा पेपरचा उपयोग करतात तेव्हा मात्र माझाही जीव गरमीने वरखाली होतो...
दिलेली वस्तू लगेच हक्काने परत मागून घेणाऱ्यातला मी नव्हे. आपली सवय म्हणजे मुकाट्याने संयमाने वाट पाहणे...
एकदा तर एकजण माझ्या समोरुन माझ्याच पेपरसह उतरुन गेला आणि मी नुसताच 'आ' वासून त्याच्याकडे पाहत राहीलो होतो..
कधीकधी तर आख्या ४ तासांच्या प्रवासात मला माझाच पेपर वाचायला मिळत नाही.
परंतू आता मला त्याचे अजिबात वाईट वाटत नाही. मुळात स्मार्टफोनच्या जमान्यात कागदी पेपर वाचणाऱ्यांची संख्या तशी कमीच झाली आहे हल्ली...
पूर्वी ओळन्ओळ बारकाईने वाचणारे वाचक होते. आता पेपर वाचायला आमच्याकडे वेळच नसतो. आणि योगायोगाने वाचलाच तर वरवरच्या फक्त ठळक घडामोडी ! अर्थात याला काहीजण अपवाद असतीलही...
तर मंडळी दिवसभर मोबाईलचा फक्त मनोरंजन म्हणून वापर करणारे आपण खरंच वाचनापासून, ज्ञानापासून दूर चाललो आहोत का??
माझ्या मते लिहीणाऱ्यांची संख्या जशी कमी होत चाललेय तशी वाचणाऱ्यांचीही संख्या घटत चाललेय हे नक्की.
आता एक गोष्ट मात्र मी नक्की पण जाणीवपूर्वक करतोच...
लांबच्या प्रवासाला निघाल्यावर किमान दहा-बारा रुपये खर्चून पेपर विकत घेतो.....
माझ्यासाठी नाही तर (न मागताच) इतरांना वाचायला देण्यासाठी !
माझा मोबाईल तेव्हा फुल्ल चार्ज असतो बरं का !!
●●●●●●※※※※※※※●●●●●●●※※※※※※※※
पण हल्ली मला प्रवासात जरा वेगळाच अनुभव आला-
बसमध्ये बसल्यावर.."ओ जरा पेपर बघू.." असा आवाज कानी पडला. मग काय, नाईलाज का होईना पण पेपर द्यावेच लागले.
या वर्तमानपत्र उर्फ पेपरचे बरेच किस्से मी अनुभवले आहेत. काहीजण पेपर वाचायला तर घेतात पण वाचता वाचता झोपूनही जातात..आणि पेपर मात्र परत द्यायचं काहीे नाव काढत नाहीत...!!
काहीजण वाचायला तर घेतात पण जणू काही तो पेपर आपलाच आहे अशा डौलात त्यातलं बक्षिसाचं कोडं सोडवायला घेतात...
काहीजण तर पंख्यासारखा पेपरचा उपयोग करतात तेव्हा मात्र माझाही जीव गरमीने वरखाली होतो...
दिलेली वस्तू लगेच हक्काने परत मागून घेणाऱ्यातला मी नव्हे. आपली सवय म्हणजे मुकाट्याने संयमाने वाट पाहणे...
एकदा तर एकजण माझ्या समोरुन माझ्याच पेपरसह उतरुन गेला आणि मी नुसताच 'आ' वासून त्याच्याकडे पाहत राहीलो होतो..
कधीकधी तर आख्या ४ तासांच्या प्रवासात मला माझाच पेपर वाचायला मिळत नाही.
परंतू आता मला त्याचे अजिबात वाईट वाटत नाही. मुळात स्मार्टफोनच्या जमान्यात कागदी पेपर वाचणाऱ्यांची संख्या तशी कमीच झाली आहे हल्ली...
पूर्वी ओळन्ओळ बारकाईने वाचणारे वाचक होते. आता पेपर वाचायला आमच्याकडे वेळच नसतो. आणि योगायोगाने वाचलाच तर वरवरच्या फक्त ठळक घडामोडी ! अर्थात याला काहीजण अपवाद असतीलही...
तर मंडळी दिवसभर मोबाईलचा फक्त मनोरंजन म्हणून वापर करणारे आपण खरंच वाचनापासून, ज्ञानापासून दूर चाललो आहोत का??
माझ्या मते लिहीणाऱ्यांची संख्या जशी कमी होत चाललेय तशी वाचणाऱ्यांचीही संख्या घटत चाललेय हे नक्की.
आता एक गोष्ट मात्र मी नक्की पण जाणीवपूर्वक करतोच...
लांबच्या प्रवासाला निघाल्यावर किमान दहा-बारा रुपये खर्चून पेपर विकत घेतो.....
माझ्यासाठी नाही तर (न मागताच) इतरांना वाचायला देण्यासाठी !
माझा मोबाईल तेव्हा फुल्ल चार्ज असतो बरं का !!
●●●●●●※※※※※※※●●●●●●●※※※※※※※※

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा